मंडळी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेचे नाव पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना असून, देशातील कमी उत्पादनक्षमता असलेल्या जिल्ह्यांमध्ये कृषी विकासाला चालना देण्याचा सरकारचा उद्देश आहे.
योजनेचा उद्देश
या योजनेद्वारे केंद्र सरकार आणि राज्य सरकारे एकत्र येऊन अशा धोरणांची आखणी करणार आहेत, ज्यामुळे शेती उत्पादन वाढवता येईल व शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती देणे हे देखील या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
योजनेचा विस्तार
सुरुवातीला देशातील 100 अशा जिल्ह्यांची निवड करण्यात येणार आहे जिथे कृषी उत्पादन तुलनेत कमी आहे. या उपक्रमामुळे सुमारे 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे.
योजनेत मिळणारे लाभ
- शेतकऱ्यांना उत्तम प्रतीची बियाणे स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जातील.
- मोफत खते देण्यात येतील, ज्यामुळे उत्पादनक्षमता वाढेल.
- लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर, पंप, यंत्रसामग्री यांसारख्या कृषी उपकरणांवर अनुदान मिळेल.
- शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाईल.
- शेतीसाठी आवश्यक असणारी आर्थिक मदत देखील पुरवली जाईल. लाभार्थी कोण असतील?
ही योजना छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असून जीवनमान उंचावण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, महिला शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन दिले जाणार असून, शेतीच्या क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.