कडाक्याच्या थंडीत या जिल्ह्यात पाऊस ? अवकाळी पावसाची शक्यता !

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
weather news latest update

मित्रांनो सध्या हवामानातील बदल नागरिकांच्या आरोग्यावर प्रभाव टाकत आहेत. उत्तर भारतातून येणारे गार वारे राज्यात थंडीचा कडाकाही वाढवत आहेत. हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच अवकाळी पावसाचा इशाराही दिला आहे.

हवामानातील या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे, कारण अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. हवामान विभागाने मराठवाडा, मध्य व उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो.

सोमवारी मुंबईत १३ अंश आणि पुण्यात १३.८ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत पारा १२ अंशांच्या खाली गेला आहे. नागपूर (११.२), अमरावती (११.९), गोंदिया (११.४), आणि गडचिरोली (१२.०) येथील तापमानाची तीव्रता वाढली आहे. नाशिक (१४.७), कोल्हापूर (१६.१), सोलापूर (१७.२), आणि सातारा (१२.८) येथेही थंडीचा प्रभाव जाणवला आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस पडल्यास पिकांच्या नुकसानीचा धोका अधिक वाढेल.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.