नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ई-पिक पाहणीची अट शिथिल करण्यात आली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई देण्यात येणार आहे.
नुकसान भरपाई थेट खात्यात जमा होणार
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेता, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच नुकसानभरपाईची रक्कम जमा केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल.
ई-पिक पाहणी न केलेल्यांनाही मदत
पूर्वीच्या निकषांनुसार फक्त ई-पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांनाच भरपाई मिळणार होती. परंतु अनेक शेतकरी पाहणीपासून वंचित राहिले होते. त्यामुळे सरकारने ही अट रद्द करून सरसकट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांसाठी सरकारचा दिलासा
कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीसाठी न्याय मिळेल आणि त्यांची आर्थिक अवस्था सुधारण्यास मदत होईल.