मोठी बातमी !! राज्यातील 30 टक्के कुटुंबांचे स्वस्त धान्य होणार बंद ….. पहा नवीन यादी

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
ration card 30 percentage rejected

मंडळी राज्य शासनाने स्वस्त धान्य योजनेसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा उपक्रम राबवला जात असला तरी अद्याप 30% लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. परिणामी, अशा लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा थांबवण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. विशेषता पुणे जिल्हा ई-केवायसीच्या अंमलबजावणीत सर्वात मागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील ई-केवायसी स्थिती

सतत मुदतवाढ देऊनही राज्यातील केवायसीचे प्रमाण 70% वर स्थिरावले आहे. ठाणे, भंडारा आणि वर्धा या जिल्ह्यांत चांगली प्रगती दिसून आली असली तरी, पुणे जिल्ह्यात केवळ 54.42% लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे.

ई-केवायसी पूर्ण न करणारे प्रमुख जिल्हे

  • पुणे — 46.58%
  • परभणी — 39.83%
  • बीड — 38.08%
  • नागपूर — 37.87%
  • नांदेड — 37.33%
  • धुळे — 36.89%
  • धाराशिव — 36.44%
  • जळगाव — 36.04%
  • नंदुरबार — 35.38%
  • लातूर — 35.04%
  • हिंगोली — 34.58%
  • सिंधुदुर्ग — 34.19%

ई-केवायसीसाठी अंतिम मुदत आणि प्रक्रिया

सुरुवातीला 1 नोव्हेंबर 2024 ही अंतिम तारीख होती. प्रशासनाने मुदत वाढवत आता 15 मार्च 2025 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे.

रेशनकार्ड धारकांनी काय करावे?

शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्यासाठी ई-केवायसी बंधनकारक आहे. जर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर संबंधित लाभार्थ्यांना धान्य मिळणार नाही.

ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी?

लाभार्थी आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन 4G ई-पॉस (e-POS) मशीनच्या साहाय्याने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ई-केवायसी पूर्ण

राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये 70% हून अधिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

सर्वाधिक ई-केवायसी झालेल्या जिल्हे

  • ठाणे — 76.59%
  • भंडारा, वर्धा — 76.49%
  • गोंदिया — 73.19%
  • चंद्रपूर — 73.07%
  • नाशिक — 72.01%
  • छत्रपती संभाजीनगर — 71.48%

धान्य पुरवठा थांबण्याचा धोका

रत्नागिरी, वाशिम, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांतही 1 मार्चपर्यंत 70% पेक्षा जास्त ई-केवायसी पूर्ण झाली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की 15 मार्च 2025 पर्यंत सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांच्या धान्य पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांना स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे संबंधितांनी तातडीने जवळच्या रेशन दुकानात जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.