विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मिळणार दहा लाखांपर्यंत कर्ज, असा करा अर्ज

Jyoti Tongalkar

By Jyoti Tongalkar

Published on:

Follow Us
PM vidya laxmi scheme

गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षणासाठी पैशाची चिंता करावी लागणार नाही. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडवण्यासाठी पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजनेंतर्गत १० लाखांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विद्यार्थी हे कर्ज हमीदाराशिवाय कोणत्याही बँकेतून घेऊ शकतील.

विशेष म्हणजे, त्यांना या कर्जावर अवघे तीन टक्के व्याज द्यावे लागणार आहे. देशातील २२ लाख होतकरू विद्यार्थी दरवर्षी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची
माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र सरकारने गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना आणली आहे. या योजनेला बुधवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

आठ लाखांहून कमी उत्पन्न असलेली कुटुंबे योजनेसाठी पात्र

ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील. सध्या ४.५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांपेक्षा ही योजना पूर्णतः वेगळी आहे. विद्यार्थी या कर्जासाठी पीएम विद्यालक्ष्मी पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात.

Jyoti Tongalkar

Jyoti Tongalkar

ज्योती टोंगळकर (Jyoti Tongalkar) हि एक content writer असून यांना मराठी भाषेत पोस्ट लिहिण्याचा ५ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण एम.कॉम.बी.एड. झाले असून ते सिनियर content writer म्हणून काम करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.