मंडळी प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही केंद्र सरकारने फेरीवाल्यांना व्यवसायासाठी मदत करण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे. या योजनेद्वारे बिनव्याजी कर्जाची सुविधा उपलब्ध आहे, ज्याचा फायदा अनेक छोटे व्यवसाय करणाऱ्यांना झाला आहे.
योजनेची उद्दिष्टे
लॉकडाऊनच्या काळात अनेक लहान व्यवसाय अडचणीत आले होते. या अडचणीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारने फेरीवाल्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करता यावा म्हणून प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली.
कर्जाची रक्कम
या योजनेत सुरुवातीला 10,000 रुपये बिनव्याजी कर्ज दिले जाते. जर हे कर्ज वेळेवर परतफेड केले, तर त्यानंतर 20,000 रुपये आणि नंतर 50,000 रुपये कर्ज मिळण्याची सोय आहे.
आत्तापर्यंतचे कर्जवितरण
केंद्र सरकारने योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 21 लाख 29 हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे, ज्याचा लाभ असंख्य व्यवसायिकांनी घेतला आहे.
योजनेसाठी पात्रता
ही योजना विविध प्रकारच्या छोटे व्यवसाय करणाऱ्यांसाठी आहे, जसे की
- सलून दुकानदार
- चप्पल शिवणारे
- पानपट्टी चालक
- धोबी
- भजीपाला विक्रेते
- फळविक्रेते
- चहाचे ठेले चालक
- ब्रेड, भाजी विक्रेते
- कपडे विक्रेते
- पुस्तके व हस्तव्यवसाय उत्पादने विक्रेते
आवश्यक कागदपत्रे
- रहिवासी प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक पासबुक
वरील सर्व कागदपत्रे अर्जाच्या वेळी सादर करावी लागतील.
अर्ज कसा करावा
अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो.
- ऑफलाईन अर्जसाठी स्थानिक महानगरपालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अर्ज करावा लागेल.
- ऑनलाईन अर्जासाठी, PM SVANidhi च्या वेबसाइटवर अर्ज करावा लागतो किंवा जवळच्या CSC केंद्रावर जाऊन त्यांच्या मदतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.
योजना लाभ घेऊन फेरीवाले त्यांचा व्यवसाय पुनःस्थापित करू शकतात आणि आपले आर्थिक स्थैर्य सुधारू शकतात.