पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी करा, अन्यथा पैसे मिळणार नाहीत

Siddharth Tambe

By Siddharth Tambe

Published on:

Follow Us
pm kisan ekyc

मंडळी केंद्र सरकारद्वारे पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत 6,000 रुपये दिले जातात. यासोबतच महाराष्ट्र राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपये अतिरिक्त अनुदान दिले जाते. अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 12,000 रुपयांचा लाभ मिळतो.

योजनेतील लाभार्थ्यांमध्ये काही बोगस नोंदी आढळल्यामुळे केंद्र सरकारने ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक केले आहे. परंतु तांत्रिक कारणांमुळे ई-केवायसी प्रक्रियेमध्ये अडचणी येत आहेत, ज्यामुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना मागील हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत. योजनेतून अपात्र ठरू नये म्हणून, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी ती प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे.

महाराष्ट्रातील सुमारे 15 लाख शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी.

पीएम किसान योजनेचा स्टेटस कसा तपासायचा?

1) pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2) मुख्यपृष्ठावरील लाभार्थी स्थितीच्या (Beneficiary Status) पर्यायावर क्लिक करा.
3) आवश्यक माहिती भरून Get Data वर क्लिक करा. यानंतर तुमचे स्टेटस स्क्रीनवर दिसेल.

कोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही?

1) पती-पत्नींपैकी केवळ एकालाच या योजनेचा लाभ घेता येईल.
2) ज्या शेतकऱ्यांनी आपली जमीन शेती सोडून अन्य कोणत्याही कामासाठी वापरली असेल, त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे.
3) ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
4) अन्य शेतकऱ्यांची जमीन भाड्याने केलेल्यांना या योजनेतून वगळले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीन मालकी आवश्यक आहे.
5) आजी-माजी आमदार, खासदार, आणि मंत्री यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.

यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ सुनिश्चित करावा.

Siddharth Tambe

Siddharth Tambe

सिद्धार्थ तांबे (Siddharth Tambe) हे एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ते मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.