या शेतकऱ्यांना मिळणार 36000 रुपये नुकसानभरपाई , पहा यादीत आपले नाव

Siddharth Tambe

By Siddharth Tambe

Published on:

Follow Us
nuksaan bharpai 36000

नमस्कार मित्रांनो राज्यातील अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आता मदतीचा हात मिळणार आहे. राज्य सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे की, तीन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना विविध प्रकारे नुकसानभरपाई दिली जाईल. जीरायती पिकांसाठी हेक्टरी १३,६०० रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १७,००० रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६,००० रुपये नुकसानभरपाई दिली जाईल.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेती व फळपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा आढावा घेत राज्य सरकारने नोव्हेंबरमध्ये मदत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या रोषामुळे आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यामुळे सरकारने तातडीने त्यांना ३ हेक्टरपर्यंत मदत देण्याचे निर्देश दिले.

पूर्वी शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत मदत मिळत होती, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही मर्यादा ३ हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली. यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता लवकरच हि मदत मिळणार आहे, ज्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.

Siddharth Tambe

Siddharth Tambe

सिद्धार्थ तांबे (Siddharth Tambe) हे एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ते मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.