मंडळी आज आपण अटल पेन्शन योजना या महत्त्वाच्या सरकारी योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. ही योजना मुख्यता असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी राबवण्यात आली असून, केवळ दररोज 7 रुपये गुंतवून तुम्ही निवृत्तीनंतर दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळवू शकता. ही योजना भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी खूपच उपयुक्त ठरत आहे.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी भारतातील 18 ते 40 वयोगटातील कोणताही नागरिक पात्र आहे. अर्ज करताना आधार कार्ड, बँक खाते आणि ओळखपत्र आवश्यक असते. एकदा अर्ज स्वीकृत झाल्यानंतर, अर्जदाराने ठराविक वयापर्यंत नियमित मासिक योगदान द्यावे लागते. यानुसार 60 व्या वर्षानंतर निवृत्तीचे वय गाठल्यानंतर त्याला दरमहा 1000 ते 5000 रुपये पर्यंत पेन्शन मिळते. अर्जदाराच्या मृत्यूनंतर पेन्शन त्याच्या जोडीदाराला दिले जाते, आणि त्यानंतर शिल्लक रक्कम नामनिर्देशित व्यक्तीला हस्तांतरित केली जाते.
गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 1.17 कोटी लोकांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे. सध्या देशभरात 7.60 कोटीहून अधिक भागधारक आहेत. या योजनेत महिलांचा सहभाग विशेष आहे – 55 टक्क्यांहून अधिक नव्या नोंदण्या महिलांच्या आहेत. योजनेत गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करसवलतही मिळते.
या योजनेत अर्ज करणे सोपे असून, तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन ऑफलाइन अर्ज करू शकता किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्जही करता येतो. तुमचे वय आणि मासिक गुंतवणुकीनुसार तुम्हाला किती पेन्शन मिळेल, हे ठरते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 18 वर्षांचे असाल आणि दरमहा ₹210 गुंतवले, तर तुम्हाला 60 वर्षांनंतर ₹5000 पेन्शन मिळण्याची हमी मिळते.
एकूणच अटल पेन्शन योजना ही एक सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय आहे ज्यामुळे थोड्याशा गुंतवणुकीतून निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळवता येते.