मंडळी राज्यातील महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात होणार असल्यामुळे काही महिलांना स्वस्त दरात सिलेंडर मिळणार आहेत. कोणत्या महिलांना हा लाभ मिळणार आहे, त्यासाठी काय प्रक्रिया आहे आणि किती दरकपात झाली आहे, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
राज्यातील महिलांसाठी सरकारकडून विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी अन्नपूर्णा योजना राबवली असून, त्याअंतर्गत महिलांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळतील. या योजनेव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये काही महिलांना गॅस सिलेंडर कमी दरात मिळणार आहे.
गॅस सिलेंडर हा प्रत्येक घरातील अत्यावश्यक वस्तूंपैकी एक आहे. शहरी भागात जवळपास प्रत्येक घरात एलपीजी गॅसचा वापर केला जातो, तर ग्रामीण भागात अजूनही लाकूडफाटा आणि इतर पारंपरिक इंधनाचा वापर केला जातो. पण अलीकडच्या काळात ग्रामीण भागातही गॅस सिलेंडरचा वापर वाढत आहे.
गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्यावर सामान्य नागरिकांचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका होतो. विशेषता गृहिणींना या दरकपातीचा मोठा फायदा होणार आहे.
सालाच्या सुरुवातीलाच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आला आहे. देशातील प्रमुख तेल आणि गॅस कंपन्यांनी एक जानेवारी २०२५ पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात जाहीर केली आहे. याचा परिणाम दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसारख्या प्रमुख महानगरांमध्ये दिसून येत आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार, विविध शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत १४.५० ते १६ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये गॅस सिलेंडरची किंमत १८१८.५० रुपयांवरून १८०४ रुपये करण्यात आली आहे. कोलकात्यात १९२७ रुपयांवरून १९११ रुपये, मुंबईत १७५१ रुपयांवरून १७५६ रुपये, तर चेन्नईत १९८०.५० रुपयांवरून १९६६ रुपये करण्यात आली आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. दिल्लीमध्ये नोव्हेंबर महिन्यात १८०२ रुपये असलेली किंमत डिसेंबरमध्ये १८१८.५० रुपये झाली होती. मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यातही दरवाढ झाली होती. २०२५ च्या सुरुवातीला या किमतीत काहीशी कपात करण्यात आली आहे.
१४ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत ८०३ रुपये, कोलकात्यात ८२९ रुपये, मुंबईत ८०२.५० रुपये आणि चेन्नईत ८१८.५० रुपये एवढे दर कायम आहेत.
महिलांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, त्यामुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळेल. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना अधिक फायदेशीर ठरणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांच्या दैनंदिन खर्चात बचत होईल.