25 जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून अलर्ट जारी …… या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस

Maha News

By Maha News

Published on:

Follow Us
25 districts high alart declaired

मंडळी महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल झाला असून उष्ण वातावरणाचा प्रभाव कमी झाला आहे. हवामान विभागाने आगामी पाच दिवसांसाठी पावसाचा अलर्ट जाहीर केला आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे राज्यात पावसाचा जोर आणि गारपिटीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासोबतच दक्षिणेकडून सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाल्याने हवामानात वेगाने बदल होत आहेत.

महाराष्ट्रातील अर्ध्यापेक्षा जास्त भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, आगामी पाच दिवस राज्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. दिवसा तापमानात हळूहळू वाढ होईल, परंतु संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह पाऊस सुरू होण्यामुळे कमाल तापमानात घट होऊ शकते.

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि धुळे जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसांपर्यंत याच प्रकारचे हवामान राहू शकते. धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्येही हलका पाऊस किंवा ढगाळ वातावरण राहील.

दुसरीकडे, जळगाव, नाशिक, घाट परिसर, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, अकोला, बुलढाणा, चंदूपर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Comment

Disclaimer: या वेबसाइटवर प्रकाशित करण्यात येणाऱ्या सरकारी योजना, शेतकरी योजना हे फक्त माहिती देण्यासाठी आहेत आणि ते कायदेशीर दस्तऐवज असल्याचे समजू नये. या संकेतस्थळावरील माहिती शक्य तितक्या अस्सल म्हणून उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले आहेत. या वेबसाइटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व माहितीच्या अनवधानाने झालेल्या कोणत्याही त्रुटीसाठी आम्ही जबाबदार नाही. सर्व लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेले आहे. महान्युज हि वेबसाईट या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.