भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या चलनी नोटांच्या व्यवस्थापनामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) महत्वाची भूमिका बजावत आहे. अलीकडील काळात RBI ने घेतलेला निर्णय हे देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी व चलन व्यवस्थेच्या गुणवत्तेकरीता महत्वाचे ठरत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये RBI ने विविध मूल्यांच्या नोटांच्या संदर्भामध्ये घेण्यात आलेला हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहेत.
सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे 200₹/- च्या नोटांसंदर्भामधील. RBI ने नुकतेच 137 कोटी रुपयांच्या किमतीच्या 200₹/- च्या नोटा बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे मुख्य कारण म्हणजे या नोटांची खराब होत चाललेली अवस्था. बाजारामध्ये वापरण्यात असलेल्या अनेक नोटा फाटलेल्या, घासलेल्या किंवा त्याच्यावर वेगवेगळ्या नोंदी लिहिलेल्या अशा परिस्थितीत सापडल्या आहेत. अशा खराब परिस्थितीमध्ये नोटा चलनामध्ये ठेवणे हे आर्थिक व्यवहारांच्या सुरळीत प्रवाहासाठी योग्य नाही, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे मत आहे.
RBI ने घेतलेला हा निर्णय 200₹/- च्या नोटांच्या संपूर्ण बंदी केल्याचा नाही, हे सांगणे गरजेचे आहे. RBI ने स्पष्ट सांगितले आहे की या नोटा चलनामधून पूर्णपणे रद्द करण्याचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. फक्त खराब झालेल्या नोटा बदलून त्या जागी नवीन, स्वच्छ नोटा आणण्याचा हा प्रयत्न आहे. मागील वर्षीही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने असाच निर्णय घेऊन 135 कोटी रुपये किमतीच्या 200 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या.
RBI ने केलेली ही कार्यवाही केवळ 200 रुपयाच्या नोटापुरती मर्यादित नाही. विविध मूल्यांच्या नोटांचीही तपासणी करून खराब परिस्थिती मधील या नोटा बाजारातून काढून टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मूल्यांपासून ते मोठ्या मूल्यांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या नोटांचा यामध्ये समावेश आहे.
1) 5 रुपयांच्या 3.7 कोटी रुपयांच्या नोटा
2) 10 रुपयांच्या 234 कोटी रुपयांच्या नोटा
3) 20 रुपयांच्या 139 कोटी रुपयांच्या नोटा
4) 50 रुपयांच्या 190 कोटी रुपयांच्या नोटा
5) 100 रुपयांच्या 602 कोटी रुपयांच्या नोटा
या सर्व प्रकारच्या नोटा त्यांच्या खराब अवस्थेमुळे चलनामधून काढून टाकण्यात आल्या आहेत. या निर्णयामागे अनेक प्रकारची कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवणे.खराब परिस्थितीमध्ये नोटांमुळे दैनंदिन व्यवहारांमध्ये होणाऱ्या अडचणी येऊ शकतात. दुकानदार किंवा व्यापारी अशा प्रकारच्या नोटा स्वीकारण्यास नकार देतात, ज्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने घेतलेल्या या निर्णयामुळे बँकांवर काही जबाबदाऱ्या येणार आहेत. बँकांना खराब परीस्थिती मधील नोटा जमा करून त्या रिझर्व्ह बँकेकडे पाठवाव्या लागणार आहेत. त्याचबरोबर नवीन नोटांचे सुद्धा वितरण करण्याचीही जबाबदारी बँकेवर येणार आहेत. यासाठी बँकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.